(मुंबई प्रतिनिधी बबनराव मोहिते)
मीरा-भाईंदर परिसरात राजकीय वातावरण तापलं असून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे नेते अविनाश जाधव यांनी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना थेट आव्हान दिलं आहे. “४ मे रोजी मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवा, तुमचं चॅलेंज मी स्वीकारलं आहे,” असा ठाम इशारा जाधव यांनी दिला.
जाधव यांनी सदावर्तेंनी केलेल्या १५ लाख रिक्षाचालकांच्या आंदोलनाच्या दाव्यालाही फेटाळून लावलं. त्यांनी स्पष्ट केलं की, मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे ४.१० लाख रिक्षा असून त्यापैकी ६५ टक्के चालक मराठी आहेत.
या पार्श्वभूमीवर आता ४ मे रोजी नेमकं काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मराठी अस्मिता आणि स्थानिकांच्या हक्कांवरून हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























