- ,(जालना जिल्हा प्रतिनिधी राहुल नामदेव बोबडे )
पुणे : उस उत्पादक शेतकऱ्यांना २०२५-२६ हंगामातील थकीत उस बिल तात्काळ देण्यात यावे, तसेच विलंब झालेल्या कालावधीचे व्याजासह रक्कम देण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत साखर आयुक्त कार्यालय, शिवाजीनगर पुणे येथे निवेदन देण्यात आले.
रयत क्रांती संघटनेचे मराठवाडा युवक अध्यक्ष गजानन अशोबा राजवंदे पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सचिन घायाळ शुगर प्रा. लि. संचलित संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, एकनाथनगर, पैठण (जि. औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर) या कारखान्याने २०२५-२६ हंगामातील उस घेतला असला तरी अद्याप शेतकऱ्यांना उस बिल मिळालेले नाही.
तसेच, थकीत उस बिल तातडीने देण्यात यावे अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या निवेदनावर गजानन अशोबा राजवंदे पाटील (अध्यक्ष, रयत क्रांती संघटना मराठवाडा युवक) तसेच राहुल ज्ञानदेव बोबडे (जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती संघटना युवक, जालना) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात उस उत्पादक शेतकऱ्यांची नावेही नमूद करण्यात आली असून त्यामध्ये कैलास ज्ञानदेव बोबडे, अप्पासाहेब सुंदरलाल वाकोळकर, बालासाहेब सिताराम डोके, नामदेव रामकिशन कोल्हेगाव आणि केशव वेंजनाथ वाघमट यांचा समावेश आहे.
दरम्यान, निवेदनाची प्रत साखर आयुक्त कार्यालय पुणे, संबंधित मंत्री व शासकीय अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























