आळंदी देवाची,(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी सचिन शिंदे)
आळंदी / प्रतिनिधी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा पुण्यातील मुक्काम यंदाही पूर्वीप्रमाणे भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथेच होणार असल्याची अधिकृत घोषणा पालखी सोहळा प्रमुख व आळंदी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र उमाप यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. पुणे जिल्हाधिकारी प्रशासनाने सेवा-सुविधा, रस्ता रुंदीकरण, अतिक्रमण हटवणे आणि भाविकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याबाबत लेखी हमी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
आळंदी येथील भक्तनिवास येथे झालेल्या पत्रकार परिषदेला डॉ. भावार्थ देखणे, चैतन्य महाराज लोंढे, राजेंद्र आरफळकर, रोहिणी पवार, भाऊ महाराज फुरसुंगीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यंदा ८ जुलै २०२६ रोजी आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर येथून हरिनाम गजरात पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. त्यानंतर ९ व १० जुलै रोजी पुण्यातील भवानी पेठ येथे दोन दिवस मुक्काम असेल.
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिलेल्या हमीपत्रानुसार पालखी मार्गावरील अतिक्रमण हटविणे, रस्ते सुस्थितीत करणे, विजेचे खांब स्थलांतरित करणे आणि भाविकांसाठी सुरक्षित व्यवस्था उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. यामुळे पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या निर्णयासाठी मागील दोन महिन्यांपासून सातत्याने बैठका, संवाद आणि पत्रव्यवहार सुरू होता. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, पुणे महानगरपालिका, दिंडी समाज संघटना आणि वारकरी संप्रदायातील मान्यवर यांचा सहभाग होता.
दरम्यान, अपरा एकादशी निमित्त इंद्रायणी नदी घाटावर हरिनाम गजरात आरती संपन्न झाली. तेजोत्सवासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. क्ष

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम





















