Homeताज्या बातम्याआळंदीत वाहतूक नियोजनासाठी जनहित सूचना भागीरथी नाल्यावर मोफत पार्किंग व्यवस्था प्रभावी करण्याची...

आळंदीत वाहतूक नियोजनासाठी जनहित सूचना भागीरथी नाल्यावर मोफत पार्किंग व्यवस्था प्रभावी करण्याची मागणी

आळंदी ,(प्रतिनिधी रोहिदास कदम) शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अव्यवस्थित पार्किंग आणि मंदिर परिसरातील गर्दी लक्षात घेता स्वच्छ, सुंदर, हरित आणि वाहतूक कोंडीमुक्त अलंकापुरी अभियानाचे प्रवर्तक तथा आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी नगरपरिषद प्रशासनाला जनहितार्थ महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.
मेदनकर यांनी सांगितले की, केवळ दंडात्मक कारवाई करून वाहने हटविणे हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. वाहनचालकांना योग्य पर्याय आणि नियोजन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मंदिर परिसरातील पायऱ्यांजवळ बॅरिकेट्सच्या सहाय्याने वाहन नियंत्रण केले जाते. मात्र बॅरिकेट्स नसल्यास भाविक थेट पायऱ्यांकडे उतरतात आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.
त्यामुळे नगरपरिषदेकडून भागीरथी नाल्यावर पर्यायी पार्किंगची प्रभावी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वाहनधारकांना त्या ठिकाणी सहज पोहोचता यावे यासाठी मार्गदर्शक फलक लावणे, “मोफत पार्किंग”ची माहिती दर्शविणारे बोर्ड उभारणे आणि वाहतूक व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच भागीरथी नाला परिसर स्वच्छ ठेवण्यावरही भर देण्यात आला आहे. पार्किंगसाठी नागरिकांचा विश्वास निर्माण व्हावा यासाठी नियमित स्वच्छता, कचरा निर्मूलन आणि परिसराचे सुशोभीकरण सातत्याने केले पाहिजे, असेही मेदनकर यांनी नमूद केले.
“स्वच्छता, सुयोग्य वाहतूक नियोजन आणि नागरिकांचा सहभाग यामुळेच आळंदी शहर अधिक सुंदर आणि भाविकांसाठी सुलभ होईल,” असे मत अर्जुन मेदनकर यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ लागू; जबरदस्ती, फसवणूक व आमिषाने धर्मांतराला आळा मुंबई

0
पुरंदर| (प्रतिनिधी अशोक कुंभार) महाराष्ट्रात 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६' अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभर लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर ३० जुलैपासून...

कोल्हापुरात उभारले जाणार राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन’

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार): लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती...

आळंदीत जाणीव संघटने तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

0
आळंदी / वार्ताहर माऊली घुंडरे:)येथील जाणीव संघटना प्रणित महिला मंडळ, पथारी व्यवसायिक यांचे वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

साईबाबांच्या चरणी विक्रमी दान; अवघ्या तीन दिवसांत ७७ कोटी ८१ लाखांची देणगी

0
बीड | प्रतिनिधी मेघा चाटे शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त देश-विदेशातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. २८ ते ३० जुलै २०२६...

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ लागू; जबरदस्ती, फसवणूक व आमिषाने धर्मांतराला आळा मुंबई

0
पुरंदर| (प्रतिनिधी अशोक कुंभार) महाराष्ट्रात 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६' अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभर लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर ३० जुलैपासून...

कोल्हापुरात उभारले जाणार राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन’

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार): लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती...

आळंदीत जाणीव संघटने तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

0
आळंदी / वार्ताहर माऊली घुंडरे:)येथील जाणीव संघटना प्रणित महिला मंडळ, पथारी व्यवसायिक यांचे वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

साईबाबांच्या चरणी विक्रमी दान; अवघ्या तीन दिवसांत ७७ कोटी ८१ लाखांची देणगी

0
बीड | प्रतिनिधी मेघा चाटे शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त देश-विदेशातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. २८ ते ३० जुलै २०२६...
Translate »
error: Content is protected !!