बातमी रोहिदास कदम
आळंदी-देवाची येथील समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा येथे बेकायदेशीर राजकीय मेळावा आयोजित करण्यात आल्याचा आरोप करत आळंदी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
धर्मशाळेचे सचिव श्री. रमेश आनंदराव सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, दिनांक २८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता धर्मशाळेच्या आवारात राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक उपस्थित राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीत असे म्हटले आहे की, धर्मशाळेच्या आवारात कोणत्याही प्रकारच्या राजकीय कार्यक्रमास परवानगी बांधकाम परवाना देण्यात आलेली नाही. तसेच संबंधित आयोजकांनी पोलीस स्टेशन किंवा नगरपालिकेकडून आवश्यक परवानगी घेतलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे धर्मशाळेच्या नियमांचे उल्लंघन होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी धर्मशाळा प्रशासनाकडून करण्यात आली आहे .

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























