Homeसामाजिकआळंदी कचरा डेपोचा भोंगळ कारभार; मुक्या जनावरांचा बळी, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच!

आळंदी कचरा डेपोचा भोंगळ कारभार; मुक्या जनावरांचा बळी, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच!

आळंदी / मानवमित्र न्यूज प्रतिनिधी संदीप मुंगसे
आळंदी नगरपरिषदेच्या कचरा डेपोतील गंभीर अनागोंदीमुळे केळगाव-सरली परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि मुक्या जनावरांवर मोठे संकट ओढवले आहे. डेपोमध्ये कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था नसल्याने आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि प्रदूषणाने कहर केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शहरातील कचरा वाहून आणणाऱ्या गाड्यांमधून रस्त्यावर सांडणारा कचरा खात-खात जनावरे थेट डेपोपर्यंत पोहोचतात. डेपोला संरक्षक कंपाऊंड नसल्यामुळे ही जनावरे आत शिरून अडकतात. अनेक जनावरांचा जीव धोक्यात येत असून, मुक्या प्राण्यांच्या जीविताची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
याहून गंभीर बाब म्हणजे डेपोमध्ये कचऱ्यावर कोणतीही शास्त्रोक्त प्रक्रिया होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वॉचमनची व्यवस्था नसल्याने डेपो बेवारस अवस्थेत आहे. डेपोमधून वाहणारे सांडपाणी, घाण आणि कचऱ्यामुळे आजूबाजूच्या शेतजमिनी प्रदूषित होत असून, दुर्गंधी आणि माशा-डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार आहे.
वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. आळंदी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने डेपोला संरक्षक भिंत उभारणे, सुरक्षा व्यवस्था करणे, कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करणे आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा केळगाव व चऱ्होली(खु)परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-२०२६ : ह.भ.प. दिलीप महाराज ठाकरे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श कीर्तनरत्न...

0
आळंदी | रोहिदास कदम: धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. दिलीप महाराज शामराव ठाकरे यांना आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-२०२६ मध्ये राज्यस्तरीय...

सिंहगड रोडवर तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; 15 जणांविरुद्ध गुन्हा, परिसरात खळबळ

0
पुणे |प्रतिनिधी अशोक कुंभार) पुण्यातील सिंहगड रोड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान एका २२ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले....

आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा...

0
आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा आळंदी, दि. ३ (प्रतिनिधी : सचिन शिंदे) – लाखो वारकऱ्यांचे...

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ लागू; जबरदस्ती, फसवणूक व आमिषाने धर्मांतराला आळा मुंबई

0
पुरंदर| (प्रतिनिधी अशोक कुंभार) महाराष्ट्रात 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६' अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभर लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर ३० जुलैपासून...

आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-२०२६ : ह.भ.प. दिलीप महाराज ठाकरे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श कीर्तनरत्न...

0
आळंदी | रोहिदास कदम: धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. दिलीप महाराज शामराव ठाकरे यांना आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-२०२६ मध्ये राज्यस्तरीय...

सिंहगड रोडवर तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; 15 जणांविरुद्ध गुन्हा, परिसरात खळबळ

0
पुणे |प्रतिनिधी अशोक कुंभार) पुण्यातील सिंहगड रोड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान एका २२ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले....

आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा...

0
आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा आळंदी, दि. ३ (प्रतिनिधी : सचिन शिंदे) – लाखो वारकऱ्यांचे...

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ लागू; जबरदस्ती, फसवणूक व आमिषाने धर्मांतराला आळा मुंबई

0
पुरंदर| (प्रतिनिधी अशोक कुंभार) महाराष्ट्रात 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६' अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभर लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर ३० जुलैपासून...
Translate »
error: Content is protected !!