🌕 त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वाई सातारा जिल्ह्यातील गणपती घाटावर दिव्यांची उजळण
वाई (प्रतिनिधींनी निर्मला पवार
दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वाई शहरासह परिसरातील महिला बांधवांनी गणपती घाटावर येऊन दिवे प्रज्वलित केले. त्यामुळे संपूर्ण घाट परिसर प्रकाशमय झाला होता.
पाण्यावर तरंगणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशाने घाट परिसर उजळून निघाला. जिकडे तिकडे दिव्यांची रास आणि तेज पसरलेले पाहून वातावरण अधिकच प्रसन्न झाले होते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या या पारंपरिक सोहळ्याने वाई नगरीत भक्तिमय आणि शांततेचे वातावरण निर्माण झाले होते.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























