काळूस (प्रतिनिधी राहुल खैरे): पुनर्वसनचे बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के हटवावेत, या मुख्य मागणीसाठी आज काळूस नगरीतील सर्व शेतकरी बांधवांनी तहसील कार्यालय, खेड येथे धडक मोर्चा काढला.
या आंदोलनावेळी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देणारे सन्माननीय उमेदवार माननीय श्री. गणेश नाना सर्जेराव आरगडे यांनी शेतकऱ्यांविषयी तळमळीने सरकारकडे न्याय मागताना आपले विचार मांडले. त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “शेतकऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही; शासनाने तत्काळ कारवाई करून जमिनीवरील शिक्के हटवावेत.”
मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली आणि आपले हक्क मिळवण्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
📍 ठिकाण: तहसील कार्यालय, खेड
🎤 नेतृत्व: श्री. गणेश नाना सर्जेराव आरगडे

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























