पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार ) आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वारीत पावसाचा त्रास टाळण्यासाठी प्रमुख पालखी मुक्काम ठिकाणी आधुनिक ‘जर्मन हँगर’ (विशेष मंडप) उभारण्यात येणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मानाच्या सुमारे ५० पालख्यांच्या मुक्कामस्थळी हे हँगर उभारले जातील. यामध्ये पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, या सर्व ठिकाणांची उभारणी व व्यवस्थापनाची जबाबदारी सोलापूर जिल्हा परिषदेकडे देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच प्रशासनाखाली कामकाज होऊन नियोजन अधिक सुसूत्र होण्याची शक्यता आहे.
या ‘जर्मन हँगर’मुळे पावसाळ्यात वारकऱ्यांना सुरक्षित, कोरडी आणि व्यवस्थित निवास व्यवस्था मिळणार आहे. दरवर्षी वारीदरम्यान पावसामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला असून, यंदाची आषाढी वारी अधिक नियोजनबद्ध आणि सोयीस्कर होणार आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























