पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार| मानव मित्र न्यूज
राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देत महागाई भत्ता (DA) ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
या वाढीमुळे हजारो एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार असून, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
यासोबतच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याची सुमारे ₹१०० कोटींची थकबाकी देखील देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना न्याय मिळाल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांबाबत राज्य सरकारच्या या निर्णयामुळे परिवहन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























