पुणे | प्रतिनिधी (: अशोक कुंभार)
पुण्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली असून, नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लोणीकंद परिसरात राहणाऱ्या वैष्णवी जामकर या महिलेने लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांतच आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी यांचे लग्न सुमारे आठ महिन्यांपूर्वी झाले होते. मात्र लग्नानंतर त्यांना सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून वैष्णवी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर वैष्णवी यांच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, लोणीकंद पोलिसांनी सासू, सासरे आणि पती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत असून, नवविवाहित महिलेच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























