Homeताज्या बातम्यापांगरे गावात तुकाराम गाथा पारायण व भागवत कथेचा भक्तिमय सोहळा उत्साहात संपन्न

पांगरे गावात तुकाराम गाथा पारायण व भागवत कथेचा भक्तिमय सोहळा उत्साहात संपन्न

बातमी प्रतिनिधी अशोक कुंभार
पांगरे : पुरंदरच्या पायथ्याशी वसलेल्या पांगरे गावात ह.भ.प. वैकुंठवासी रामचंद्र अर्जुन काकडे देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला तुकाराम महाराज गाथा पारायण व संगीतमय भागवत कथा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला.
गावातील सुपुत्र श्री. संतोष रामचंद्र काकडे यांच्या पुढाकारातून रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत तुकाराम महाराज गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी 6 ते 10 या वेळेत संगीतमय भागवत कथेला प्रारंभ झाला.
या भागवत कथेचे निरूपण ह.भ.प. श्री. संतोष महाराज पायगुडे यांनी अतिशय सोप्या, गोड व मधुर भाषेत केले. त्यांच्या प्रभावी कथनशैलीमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. संगीतमय स्वरूपातील कथा ऐकत भाविक भक्तिरसात तल्लीन झाले होते.
गाथा व्यासपीठाचे संचालन ह.भ.प. प्रशांत महाराज पुरंदरे तसेच मंगेश महाराज चौधरी (चौधरवाडी) यांनी केले. संगीतबद्ध गाथा वाचनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सौ. वंदना नंदकुमार निगडे, सौ. छाया निगडे आणि सौ. माया इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी या सप्ताहाचा समारोह संपन्न झाला. तुकाराम गाथा व भागवत कथेच्या समारोपानिमित्त काल्याचे कीर्तन ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे यांनी सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रामराजे कृष्णराव काकडे, श्री. प्रकाश राजाराम काकडे आणि श्री. जयेश पार्थ हनुमंत काकडे यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाला गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिरसाचा आनंद लुटत होते. पांगरे गावातील हा धार्मिक सोहळा श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर उदाहरण ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार पुणे बातम्या

0
पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

आषाढी एकादशी महापूजेच्या मानकरी दाम्पत्याला एसटीचा वर्षभर मोफत प्रवास

0
पुरंदर सासवड ( प्रतिनिधी अशोक कुंभार) आषाढी एकादशीच्या पवित्र महापूजेचा मान यंदा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील श्रद्धाळू माने दाम्पत्याला लाभला. या पवित्र सोहळ्यानिमित्त...

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले...

0
एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

0
रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल | पुणे बातम्या

0
नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार पुणे बातम्या

0
पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

आषाढी एकादशी महापूजेच्या मानकरी दाम्पत्याला एसटीचा वर्षभर मोफत प्रवास

0
पुरंदर सासवड ( प्रतिनिधी अशोक कुंभार) आषाढी एकादशीच्या पवित्र महापूजेचा मान यंदा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील श्रद्धाळू माने दाम्पत्याला लाभला. या पवित्र सोहळ्यानिमित्त...

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले...

0
एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

0
रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल | पुणे बातम्या

0
नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...
Translate »
error: Content is protected !!