बातमी: तिर्थपुरी राहुल बोबडे प्रतिनिधी
मिळालेल्या माहिती अनुषंगाने तिर्थपुरी शहरात ठिकठिकाणी विक्री होणाऱ्या थंड पिण्याच्या पाण्याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी RO प्लांटमधून पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचा TDS (Total Dissolved Solids) स्तर तपासला जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. तसेच थंड पाण्याच्या जारमध्ये नेमके कोणते पदार्थ किंवा रसायने मिसळून पाणी अधिक थंड केले जाते, याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी पाण्याची गुणवत्ता संशयास्पद असून ते पाणी पिल्यानंतर घसा खवखवणे, पोटदुखी, अपचन आणि इतर आरोग्यविषयक तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी सर्व RO प्लांट, पाणी शुद्धीकरण केंद्रे आणि जार पुरवठादारांची तपासणी करून TDS स्तर, पाण्याची शुद्धता आणि थंड करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियेची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी होत आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असून, अन्न व औषध प्रशासन (FDA) तसेच स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी भावना व्यक्त होत आहे.
मानव मित्र NEWS प्रश्न विचारत आहे:
“थंड पाण्याच्या नावाखाली नेमकं काय दिलं जातंय? नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?”. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























