बातमी (. प्रतिनिधी अशोक कुंभार),
गुढीपाडवा व रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त पांगरे गावात सुरू असलेल्या श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळ्याचा आज चौथा दिवस भक्तीमय वातावरणात पार पडला. दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
दुपारी साडेचार वाजता हरिभक्त परायण नेहा खेडेकर (सोनोरी) यांनी भावपूर्ण पारायण सादर केले. त्यानंतर रात्री हरिभक्त परायण नवनाथ महाराज (निमन, नसरापूर) यांचे कीर्तन झाले, ज्यामुळे परिसरात भक्तिरसाची उधळण झाली. रात्री दत्तराज पांडुरंग काकडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या पारायण सोहळ्याला यंदा ५२ वर्षे पूर्ण होत असून, ही अखंड परंपरा गावकऱ्यांनी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने जपली आहे. महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या सोहळ्याचा मनमोकळा आनंद लुटला. चौथ्या दिवसाची सांगता समाधान आणि भक्तिभावाच्या वातावरणात झाली.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























