आळंदी (अशोक कुंभार): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आळंदी पंचक्रोशीत जयंती उत्साही व शांततेत साजरी करावी, असे आवाहन आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी केले.
आळंदी पोलीस स्टेशन येथे झालेल्या शांतता कमेटी बैठकीत त्यांनी मिरवणुका वेळेत सुरू करून निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले. जयंती निमित्त होणाऱ्या मिरवणुका, रक्तदान, संविधान जागर, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम शांततेत पार पाडावेत, असेही त्यांनी सांगितले. 
१४ एप्रिल रोजी मिरवणुकांना रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर दिवशी रात्री १० वाजेपर्यंत परवानगी राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कायदा व सुव्यवस्था राखणे, ध्वनीप्रदूषण टाळणे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीस नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, डी. डी. भोसले पाटील, प्रकाश कुऱ्हाडे, संदीप रंधवे, डॉ. निलेश रंधवे जनहित फाउंडेशन अर्जुन मेदनकर यांच्यासह विविध जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























