(आळंदी प्रतिनिधी सचिन शिंदे)
आज २३ मार्च रोजी देशभरात शहीद दिन पाळून भारतमातेचे वीर सुपुत्र भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव थापर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. १९३१ साली आजच्याच दिवशी या तिघा क्रांतिकारकांना लाहोर येथील तुरुंगात ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती.
स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या अद्वितीय धैर्य, देशभक्ती आणि बलिदानामुळे ते आजही तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. “इंकलाब जिंदाबाद”चा नारा देत त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि देशासाठी आपले प्राण अर्पण केले.
या निमित्ताने विविध ठिकाणी शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अनेक ठिकाणी देशभक्तीपर भाषणे, रॅली आणि रक्तदान शिबिरेही आयोजित करण्यात आली.
शहीद दिन आपल्याला देशासाठी केलेल्या बलिदानाची जाणीव करून देतो तसेच देशसेवेची प्रेरणा देतो. या महान क्रांतिकारकांचे बलिदान सदैव स्मरणात राहील.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























