(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत मोठा इशारा दिला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, बारामतीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने निवडणूक लढवू नये. जर काँग्रेस मैदानात उतरलीच, तर त्यांचा असा पराभव करू की त्यांना पुन्हा तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख करत म्हटले की, अजित पवार यांचा बराचसा राजकीय प्रवास काँग्रेससोबत झाला आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचे संस्कार जपत निवडणूक लढवू नये आणि सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
या वक्तव्यानंतर बारामतीच्या राजकारणात नवी खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीत राजकीय चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 🔥

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























