प्रतिनिधी अशोक कुंभार):
वडार समाजासाठी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब विटकर (लोणावळा) यांच्या भाचीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीचे लग्न सुमारे दोन महिन्यांपूर्वी कल्याण-अंबरनाथ परिसरात झाले होते. विवाहानंतर तिला सासरी वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
आज दुपारी संबंधित तरुणीने बाळासाहेब विटकर यांना फोन करून, “मला खूप मारहाण केली जाते, माझी परिस्थिती गंभीर आहे,” अशी व्यथा मांडल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर नातेवाईक तिच्या मदतीसाठी निघाले. मात्र ते पोहोचण्यापूर्वीच तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
या घटनेमुळे वडार समाजात संतापाची लाट उसळली असून, मृत्यूमागील सत्य समोर आणण्यासाठी सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. हा मृत्यू आत्महत्या आहे की अन्य काही घातपात, याचा तपास पोलीस करत आहेत.
मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























