Homeताज्या बातम्यातीर्थपुरीतील शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा तीव्र; संपादित जमीन परत मिळवून देण्याची मागणी

तीर्थपुरीतील शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा तीव्र; संपादित जमीन परत मिळवून देण्याची मागणी

तीर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे
जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील शेतकऱ्यांनी संपादित करण्यात आलेल्या जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे. अनेक वर्षांपूर्वी पुनर्वसन व विविध प्रकल्पांच्या उद्देशाने सुमारे १०० शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या होत्या. मात्र आजपर्यंत त्या जमिनींचा संबंधित प्रकल्पासाठी वापर करण्यात आलेला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांचे मुख्य उपजीविकेचे साधन असलेल्या जमिनी गेल्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक व सामाजिक अडचणीत सापडली आहेत. शासनाच्या जमीन संपादन व पुनर्वसन नियमांनुसार, संपादित जमीन मूळ उद्देशासाठी वापरली गेली नसेल तर ती जमीन मूळ धारकांना परत देण्याचा विचार व्हावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात संपादित जमिनींची तात्काळ चौकशी करून वापरात नसलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत द्याव्यात, संबंधित शेतकऱ्यांची सुनावणी घ्यावी तसेच या प्रकरणी विशेष समिती नेमून प्रत्यक्ष पाहणी करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणामुळे तीर्थपुरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बातमी देणारे : शिवाभाऊ बोबडे, तीर्थपुरी शहर न्यूज प्रसारण रिपोर्टर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीएनजीच्या दरवाढीमुळे पुण्यात ऑटोरिक्षा संघटनांनी भाडेवाढीसाठी दबाव आणला | पुणे बातम्या

0
पुण्यातील ऑटोरिक्षांचे भाडे वाढण्याची अपेक्षा आहे पुणे : सीएनजीच्या वाढत्या किमती आणि चालकांवर आर्थिक दबाव वाढल्याने युनियन तात्काळ सुधारणा करण्यासाठी दबाव आणत असून...

मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाला कलाकारांचा कौल; विकासकामांची पोचपावती

0
पुणे प्रतिनिधी रोहिदास कदम)| अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलने दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले...

झुरळ जनता पार्टी 11 जून रोजी पुण्यात आंदोलन करणार, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणार

0
पुणे: झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोमवारी जाहीर केले की, परीक्षा आणि भरती चाचण्यांमधील कथित गैरप्रकारांमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांसाठी रयत क्रांती संघटनेचे निवेदन

0
प्रतिनिधी राहुल बोबडे छत्रपती संभाजीनगर, दि. ८ जून २०२६ : रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी तथा विभागीय साखर संकुल आयुक्त यांना निवेदन...

मान्सून जसजसा पुढे जाईल तसतसा शहरात हलका पाऊस पडेल | पुणे बातम्या

0
पुणे : IMD ने या आठवड्यात पुण्यासाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे आणि म्हटले आहे की शहरात “मुख्यतः निरभ्र आकाश, दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत...

सीएनजीच्या दरवाढीमुळे पुण्यात ऑटोरिक्षा संघटनांनी भाडेवाढीसाठी दबाव आणला | पुणे बातम्या

0
पुण्यातील ऑटोरिक्षांचे भाडे वाढण्याची अपेक्षा आहे पुणे : सीएनजीच्या वाढत्या किमती आणि चालकांवर आर्थिक दबाव वाढल्याने युनियन तात्काळ सुधारणा करण्यासाठी दबाव आणत असून...

मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाला कलाकारांचा कौल; विकासकामांची पोचपावती

0
पुणे प्रतिनिधी रोहिदास कदम)| अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलने दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले...

झुरळ जनता पार्टी 11 जून रोजी पुण्यात आंदोलन करणार, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणार

0
पुणे: झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोमवारी जाहीर केले की, परीक्षा आणि भरती चाचण्यांमधील कथित गैरप्रकारांमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांसाठी रयत क्रांती संघटनेचे निवेदन

0
प्रतिनिधी राहुल बोबडे छत्रपती संभाजीनगर, दि. ८ जून २०२६ : रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी तथा विभागीय साखर संकुल आयुक्त यांना निवेदन...

मान्सून जसजसा पुढे जाईल तसतसा शहरात हलका पाऊस पडेल | पुणे बातम्या

0
पुणे : IMD ने या आठवड्यात पुण्यासाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे आणि म्हटले आहे की शहरात “मुख्यतः निरभ्र आकाश, दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत...
Translate »
error: Content is protected !!