📍 आळंदी (रवि कदम) :
शनिवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता, श्री शवेताबर तानक वासीजैन संघ, आळंदी देवाचा यांच्या वतीने एक विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ओळख ज्ञानेश्वरी परिवार यांच्या वतीने साकारण्यात आलेल्या हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर जाधव (माऊली) यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. त्यांच्या हस्ते लिहिलेल्या संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे — त्यांनी एकच पेन, एकच शाई वापरून एकसारख्या सुंदर हस्ताक्षरात पूर्ण सहा महिने कालावधी संपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. आजच्या डिजिटल युगात अशी पवित्र परंपरा जपणं ही अत्यंत प्रेरणादायी बाब असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून सुरेश काका वडगावकर, प्रकाश तात्या काळे, अजित वडगावकर, अर्जुन मेदकर नंदू वडगावकर, विश्वंभर पाटील, माऊली दिघे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रकाश काळे, ज्ञानेश्वर ओळख परिवार, सुरेश काका वडगावकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, राम मंदिर ओवेकर संस्थान, अर्जुन मेदनकर सोमनाथ येळवंडे गवारे सर, विश्वंभर पाटील आणि धनाजी काळे यांनी ज्ञानेश्वर जाधव यांचा श्रीफळ, नारळ व पुष्पहार देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आयोजन उत्तमरीत्या पार पडले असून, उपस्थित सर्वांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करून. आणि परंपरेचे संवर्धन याबद्दल माऊली जाधव यांचे मनःपूर्वक कौतुक केले.
🪔 “माऊलींच्या लेखणीतून साकार झालेली ज्ञानेश्वरी — भक्ती, परंपरा आणि प्रेरणा यांचा समावेश

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























