
आळंदी (रविकदम) :
अखंड मराठा समाज आळंदी व पंचक्रोशीतील सर्व मराठा बांधवांनी आगामी मुंबई मोर्चाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येत बैठक आयोजित केली. या बैठकीत सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी स्वेच्छेने सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
👉 बैठकीचे ठळक मुद्दे :
२८ ऑगस्ट रोजी शिवनेरी येथे मुक्कामी सर्व आंदोलकांसह मोर्चा काढण्यात येणार.
पुणे जिल्ह्याची मोठी जबाबदारी लक्षात घेता प्रत्येक गावागावातून सहभाग निश्चित करण्याचे आवाहन.
आंदोलकांसाठी घरुन शिदोरी, भाकरी व वस्तुरूप मदत करण्याचे आवाहन. पंचकोशी तील ग्रामस्थांना करण्यात आला
चाकणहून २८ ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईच्या दिशेनेरॅली काढण्यात येणार.
प्रत्येक व्यक्तीला काम, वेळ किंवा मदतीनुसार जबाबदारी उचलण्याचे आवाहन.
करण्यात आले
दरम्यान, आळंदीतील सर्व मराठा समाज, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, नोकरदार, वकील, डॉक्टर, शिक्षक व व्यापारी बांधवांनी २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ८ वाजता ज्ञानदर्शन धर्मशाळा, हजोरी मारोती मंदिराजवळ होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचे ठरविले होते
अखंड मराठा समाजाच्या या मोठ्या चळवळीस आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार असून २७ ऑगस्ट रोजी शिवनेरी येथे त्यांच्या उपस्थितीत पुढील दिशा ठरविली जाणार आहे
आळंदी सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी मोर्चामध्ये चाकण मधून सामील व्हायचं आहे

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























