Homeताज्या बातम्याशिवरी मंडळ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; निलंबनाची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

शिवरी मंडळ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; निलंबनाची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार) : पुरंदर तालुक्यातील शिवरी येथील मंडळ अधिकारी (महसूल) यांच्या कारभाराविरोधात जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवरी येथील रहिवासी देवानंद गोपाळ लिंभोरे यांनी दिलेल्या तक्रारीत मंडळ अधिकाऱ्यांवर शासकीय नियमांचे उल्लंघन, खासगी कार्यालयातून कारभार चालविणे, प्रकरणे प्रलंबित ठेवणे तसेच नागरिकांची गैरसोय केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
तक्रारीनुसार संबंधित मंडळ अधिकाऱ्यांचे शासकीय कार्यालय शिवरी येथे असताना ते सासवड येथील खासगी कार्यालयातून कामकाज करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवाय नागरिकांना शासकीय कार्यालयाऐवजी खासगी कार्यालयात बोलावले जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदाराने पुढे म्हटले आहे की, मंडळ कार्यालयाच्या अखत्यारीतील विविध तलाठी कार्यालयांमध्ये खासगी व्यक्तींमार्फत कामे करून घेतली जात असून हे शासनाच्या नियमांच्या विरोधात आहे. फेरफार नोंदी व इतर महसुली प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहार होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून अनेक अर्ज व प्रकरणे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तक्रारीत महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम तसेच शासनाच्या विविध परिपत्रकांचा उल्लेख करण्यात आला असून, अनेक फाईली आणि अर्ज सहा-सहा महिने प्रलंबित राहत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वरिष्ठ कार्यालयांकडून आलेले चौकशी अहवाल आणि पंचनामे देखील वेळेत निकाली काढले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे तसेच दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केली आहे.
(सूचना : सदर आरोप तक्रार अर्जामध्ये करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोडवर तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; 15 जणांविरुद्ध गुन्हा, परिसरात खळबळ

0
पुणे |प्रतिनिधी अशोक कुंभार) पुण्यातील सिंहगड रोड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान एका २२ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले....

आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा...

0
आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा आळंदी, दि. ३ (प्रतिनिधी : सचिन शिंदे) – लाखो वारकऱ्यांचे...

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ लागू; जबरदस्ती, फसवणूक व आमिषाने धर्मांतराला आळा मुंबई

0
पुरंदर| (प्रतिनिधी अशोक कुंभार) महाराष्ट्रात 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६' अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभर लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर ३० जुलैपासून...

कोल्हापुरात उभारले जाणार राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन’

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार): लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती...

सिंहगड रोडवर तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; 15 जणांविरुद्ध गुन्हा, परिसरात खळबळ

0
पुणे |प्रतिनिधी अशोक कुंभार) पुण्यातील सिंहगड रोड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान एका २२ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले....

आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा...

0
आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा आळंदी, दि. ३ (प्रतिनिधी : सचिन शिंदे) – लाखो वारकऱ्यांचे...

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ लागू; जबरदस्ती, फसवणूक व आमिषाने धर्मांतराला आळा मुंबई

0
पुरंदर| (प्रतिनिधी अशोक कुंभार) महाराष्ट्रात 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६' अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभर लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर ३० जुलैपासून...

कोल्हापुरात उभारले जाणार राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन’

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार): लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती...
Translate »
error: Content is protected !!