पाटोदा |( प्रतिनिधी – गणेश वनवे ) . संकटात एकटेच उभा राहतो
डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटातून पांडुरंग नागरगोजे (फौजी) हे निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला वेग मिळताच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पांडुरंग नागरगोजे हे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख कार्यासाठी परिचित नेते आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध विकासकामांना चालना देत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नेहमीच पुढाकार घेतला. त्यामुळे आजही त्यांना मोठा जनाधार लाभलेला आहे.
माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात सक्रिय असलेले रोहतवाडी गावचे माजी सरपंच पांडुरंग नागरगोजे हे तरुणाईचे लाडके नेतृत्व मानले जाते. प्रामाणिकता, सर्वसामान्यांशी थेट संवाद साधण्याची शैली आणि सामाजिक बांधिलकी या गुणांमुळे त्यांनी अल्पावधीतच व्यापक लोकप्रियता मिळवली आहे.
डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटात त्यांचा प्रभाव झपाट्याने वाढत असून मतदार त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत. अनुभव आणि नव्या पिढीची ऊर्जा यांचा संगम असल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणूक अत्यंत रंगतदार व ऐतिहासिक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून डोंगरकिन्ही गटातील गावोगावी एकच चर्चा सुरू आहे—
“सर्वसामान्य, गरीब व शेतकरी कुटुंबातील नेतृत्व म्हणून पांडुरंग नागरगोजे येत्या काळात जिल्हा परिषद गटात झेंडा फडकवणार,” असे उद्गार जनतेतून व्यक्त होत आहेत. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























