बातमी:
आळंदी |संपादक रोहिदास कदम
आषाढी वारी सोहळ्यादरम्यान इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक वारकरी भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शिवसेना आळंदी शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री सहायता केंद्राच्या हँगर मंडपामध्ये वारकरी भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले.
पूरस्थितीमुळे अनेक वारकरी अडकून पडल्याने त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. सकाळपासून महाप्रसाद वितरणाचे काम सुरू असून, हजारो भाविकांना भोजन देण्याचे कार्य अखंडपणे सुरू आहे.
यावेळी राहुल चव्हाण म्हणाले, “वारकरी ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. संकटाच्या काळात त्यांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माध्यमातून महाप्रसाद वाटपाचे कार्य सुरू असून, भाविकांची सेवा हेच आमचे कर्तव्य आहे. काम करत आलोय आणि पुढेही करत राहू.”
या उपक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, भाविकांनी या सेवाभावी उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.https://youtube.com/shorts/azdOb9wvsyk?si=cGm7HMyvolM3Iw3i मानवमित्रन्यूज
यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा लाईक करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























