प्रतिनिधी : राहुल बोबडे
तीर्थापुरी, दि. ९ जुलै : तीर्थापुरी परिसरात बिबट्याचा वाढता वावर नागरिकांसाठी आणि पशुपालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. परिसरातील रेखाबाई बिरबल सिंग बावरी यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून ती ओढून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि बाधित कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रशासनाने परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी जोर धरत आहे
बिबट्याचा वावर आढळल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्या.
रात्री व पहाटे एकटे बाहेर जाणे टाळा.
पाळीव जनावरे सुरक्षित व बंदिस्त ठिकाणी ठेवा.
अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























