तीर्थपुरी | प्रतिनिधी राहुल बोबडे
महावितरणच्या तिर्थपुरी (ता. घनसावंगी) शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ एस. बी. आघाव साहेब हे आपल्या कार्यक्षम, कर्तव्यदक्ष आणि जनहिताच्या भूमिकेमुळे परिसरात विशेष ओळख निर्माण करत आहेत. वीज ग्राहकांना अखंडित, जलद आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या नेतृत्वाखाली तिर्थपुरी वीज वितरण केंद्राचा कारभार अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे.
आघाव साहेब आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून शिस्तबद्ध व वेळेत काम पूर्ण करण्यावर भर देतात. त्यांच्या प्रभावी नियोजनामुळे वीजपुरवठ्याशी संबंधित अनेक समस्या तातडीने सोडविल्या जात असून ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, पाऊस, वादळ, अंधार किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या तरी महावितरणचे कर्मचारी व अधिकारी नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. काळोख आणि संकटमय परिस्थितीतही बिनधास्तपणे घटनास्थळी पोहोचून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवाची पर्वा न करता काम करणारे हे धाडसी कर्मचारी खऱ्या अर्थाने जनसेवक आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे अनेक गावांमध्ये वेळेत वीजपुरवठा पूर्ववत होत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
ग्राहकांच्या अडचणी समजून घेत त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याची आघाव साहेबांची कार्यपद्धती सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. त्यामुळे तिर्थपुरी परिसरातील नागरिकांकडून त्यांच्या कामाचे मनापासून कौतुक केले जात आहे.
यावेळी राठोड साहेब, आण्णा जवजे आणि योगेश कायस्थ यांनीही आघाव साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा करत, जनतेसाठी दिवस-रात्र तत्परतेने काम करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा गौरव होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
महावितरणच्या सेवेला अधिक सक्षम व लोकाभिमुख बनविण्यात आघाव साहेबांचे योगदान उल्लेखनीय असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली संपूर्ण टीम जनतेच्या विश्वासास पात्र ठरत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























