पुणे (प्रतिनिधी अशोक कुंभार) विद्यार्थ्यांनी स्वयंपूर्ण अभ्यासावर भर द्यावा – तज्ज्ञांचे मार्गदर्शन
शाळांमधील परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांनी स्वयंपूर्ण अभ्यासाला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अभ्यासाचे योग्य नियोजन करून पाठ्यपुस्तकाचे नियमित वाचन केल्यास विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग सुकर होतो.
पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटक समजून घेणे, महत्त्वाच्या मुद्द्यांवर टिपण तयार करणे तसेच विविध विषयांच्या कौशल्यांवर भर देणे आवश्यक आहे. भाषा विषयांसाठी श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन कौशल्यांचा सराव तर विज्ञान व भूगोल विषयांसाठी निरीक्षण, निष्कर्ष आणि आकृतीचे आकलन महत्त्वाचे मानले जाते.
गणित विषयात लॉजिकल थिंकिंग, क्रमबद्धता आणि अचूकतेला विशेष महत्त्व असून प्रश्नपत्रिकांचा नियमित सराव केल्यास आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांनी न समजलेल्या भागांबाबत शिक्षक, पालक किंवा सहाध्यायांकडून मार्गदर्शन घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
स्वत:शी प्रामाणिक राहून सातत्याने अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते. स्वयंपूर्ण अभ्यासामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेत उत्तम कामगिरी करता येते, असे राज्य पुरस्कार प्राप्त सहाय्यक शिक्षिका सौ. हर्षा बालकृष्ण पिसाळ (निगडे) यांनी सांगितले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























