प्रतिनिधी गजानन राजबिंडे आमच्या गावचे कष्टकरी शेतकरी संत रामजी राजबिंडे यांचे चिरंजीव, उद्योजक परमेश्वर राजबिंडे यांनी शून्यातून विश्व निर्माण करत आज एक आदर्श उभा केला आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल आज समाजातील सर्व स्तरांतून त्यांचे मनापासून कौतुक होत आहे. केवळ कौतुकच नव्हे, तर अनेक गरजू लोकांना त्यांनी आधाराची साथ दिली असून, त्यामुळेच आज तालुक्यासह जिल्ह्यात त्यांची विश्वासार्ह ओळख निर्माण झाली आहे.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना, अनेक अडचणींवर मात करत त्यांनी कठोर परिश्रमाने स्वतःचे भविष्य घडवले. मिळेल त्या परिस्थितीत दिवस काढत, संघर्षातूनच त्यांनी यशाचा मार्ग शोधला. या मेहनतीचे फळ म्हणून आज वासप्रम फाउंडेशन हे नाव केवळ जालना जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत, गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या आणि गरजू घटकांच्या मदतीसाठी वासप्रम फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे. परमेश्वर राजबिंडे यांची ही प्रेरणादायी वाटचाल आजच्या तरुण पिढीसाठी निश्चितच आदर्श ठरत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























