सावरगाव (ता. अर्धापूर) प्रतिनिधीनितीन आबालाल)
देशाच्या कर्तव्यासाठी जीवाचं रान करण्याची तयारी ठेवणारा, सावरगाव (तालुका अर्धापूर) येथील कर्तव्यनिष्ठ युवक सत्यम किशनराव कल्याणकर यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) निवड झाली आहे. लहानपणापासूनच देशसेवेची ओढ असलेल्या सत्यम यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि शिस्तीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
सामान्य कुटुंबातून आलेल्या सत्यम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता शारीरिक मेहनत, स्पर्धा परीक्षेची तयारी आणि मानसिक कणखरपणा जपला. “देशासाठी काहीतरी करायचं” हेच त्यांचं ध्येय असून, त्यांची ही निवड आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल कलावती आबादार व नितीन आबादार यांच्या हस्ते सत्यम कल्याणकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्यम यांच्या निवडीमुळे सावरगाव व अर्धापूर तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, गावकऱ्यांसह नातेवाईक व मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























