पुणे (प्रतिनिधी) — स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांनी दिनांक ४ जून १९६७ रोजी मेहतर वाल्मिकी समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रोत्साहन व मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने विद्यार्थी सेवा संघाची स्थापना केली होती. या परंपरेला चालना देत, यावर्षी या विद्यार्थी सत्कार समारंभाचे ५८ वे वर्ष साजरे करण्यात आले.
या प्रसंगी इयत्ता ५वी ते पदवीपर्यंत तसेच उच्च शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास अहिल्यानगरचे खासदार मा. निलेश लंके साहेब, माजी गृहराज्यमंत्री मा. रमेशदादा बागवे, तसेच मेहतर वाल्मिकी महासंघाचे अध्यक्ष रवीभाई परदेशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद विद्यार्थी सेवा संघाचे विश्वस्त मा. नरोत्तमजी चव्हाण यांनी भूषवले. यावेळी संघाचे विश्वस्त मा. कविराज फत्तुजी संघेलिया, मा. विश्वास छोटूजी चव्हाण, मा. बंडू नारायण चरण, मा. कणव वसंतराव चव्हाण, मा. सिद्धांत नारायण सारवान, मा. प्रमोद मोतीलाल निनारिया आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष श्री. धनराज एकनाथजी जावा, महासचिव श्री. रवीजी भिंगानीया, सत्कारप्रमुख श्री. शैलेंद्र दिगंबरजी चव्हाण, कार्याध्यक्ष श्री. विकास विजय कसोटे व कोषाध्यक्ष श्री. रवीजी वाघेला यांनी केले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ मार्गदर्शक, माजी अध्यक्ष व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमात गोपि कसोटे, निकेत चव्हाण, अशोक मेमजादे, नितीन खरे, अश्विन मंचरकर, रितेश लोट, अक्षय वाघेला, समीर सय्यद, स्वप्निल कदम, हितेश घोडके, पुष्पक चव्हाण आणि इतर कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























