पुणे प्रतिनिधी रविदास कदम) जीवनात यश–अपयश अपरिहार्य असून अपयशासाठी इतरांना दोष न देता स्वतःच्या चुकांवर काम केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन ऑलिंपियन मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह यांनी केले. ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे येथे आयोजित आठव्या विश्वनाथ स्पोर्ट मिट (VSM–2026) च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
विजेंदर सिंह यांनी खेळाडूंना सातत्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाने खेळण्याचा सल्ला दिला. सध्या भारतात क्रीडा क्षेत्राचा सुवर्णकाळ सुरू असून पालकही खेळाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. एमआयटी एडीटी विद्यापीठातील जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी साईचे वरिष्ठ अधिकारी विनित कुमार, बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. सुनीता कराड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विश्वशांती प्रार्थना, ध्वजारोहण व मानवंदनेनंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























