Homeताज्या बातम्याविषारी दारूकांड : प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निष्पापांचा बळी?

विषारी दारूकांड : प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निष्पापांचा बळी?

आळंदी देवाची मानवमित्र.न्यूज संपादक रोहिदास कदम
पुणे जिल्ह्यातील विषारी दारूकांडात मृतांचा आकडा वाढत असताना आता संतापाची लाट उसळली आहे. या संपूर्ण प्रकरणासाठी केवळ दारू माफियाच नव्हे, तर संबंधित प्रशासन आणि जबाबदार यंत्रणाही तितकीच दोषी असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, अवैध हातभट्टी दारूचे अड्डे अनेक दिवसांपासून सुरू होते. संबंधित विभागांना याची माहिती असूनही वेळेत कठोर कारवाई करण्यात आली नाही. जर प्रशासनाने योग्य वेळी छापे टाकून अवैध व्यवसाय बंद केला असता, तर आज अनेक गरीब आणि कष्टकरी कुटुंबांचे आधारस्तंभ जिवंत असते.
हातावर पोट भरणाऱ्या मजुरांचा जीव गेला, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, मुलांच्या डोक्यावरचे छत्र हरपले. मात्र या सर्वासाठी जबाबदार कोण? अवैध धंदे सुरू असताना प्रशासन झोपले होते का? की काही अधिकाऱ्यांनी पैशांच्या मोहापोटी डोळेझाक केली? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
केवळ आरोपींना अटक करून हे प्रकरण संपणार नाही. या मृत्यूंसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे. कोणाच्या आशीर्वादाने हे अवैध जाळे सुरू होते, याचा शोध घेऊन कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा सामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास पूर्णपणे उडून जाईल.
“वेळेत कारवाई झाली असती, तर आज निष्पापांचे जीव वाचले असते” अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत असून, दोषींवर कठोर आणि उदाहरणात्मक कारवाईची मागणी जोर धरत आहे.
— मानव मित्र न्यूज

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पीएमसीच्या विस्तारित स्क्रीनिंगमुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब प्रकरणांमध्ये तीव्र वाढ दिसून येते | पुणे...

0
पुणे: शहरात मधुमेह आणि उच्चरक्तदाबाच्या आढळलेल्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, या वाढीचे श्रेय PMC द्वारे स्क्रीनिंग कव्हरेजमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य...

बारामती बसस्थानक राज्यात अव्वल; स्वच्छतेच्या जोरावर मिळवला १ कोटींचा मानाचा पुरस्कार

0
पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार| बारामती बसस्थानकाने महाराष्ट्रातील सर्व बसस्थानकांसमोर आदर्श निर्माण करत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानात’ राज्यात प्रथम क्रमांक पटकावला...

पेठ भागातील 6,500 ग्राहकांना वीजपुरवठा खंडित झाला पुणे बातम्या

0
महावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करतातमहावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करतातमहावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करतातमहावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करतातमहावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करतात पुणे :...

तोंडाच्या कर्करोगात 2021 पासून झपाट्याने वाढ झाली आहे, केवळ 2 महिन्यांत 250 प्रकरणे

0
पुणे : केवळ एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रात 250 पुष्टी झालेल्या प्रकरणांसह स्क्रीनिंगमध्ये वाढ झाल्याने तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत तीव्र आणि चिंताजनक...

पुणे विषारी दारू प्रकरण : भिवंडीत FDA ची धडक कारवाई, मेथेनॉल साठा जप्त

0
मानव मित्र न्यूज |मुंबई प्रतिनिधी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्यातील यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणाचे धागेदोरे आता ठाणे जिल्ह्यातील भिवंडीपर्यंत...

पीएमसीच्या विस्तारित स्क्रीनिंगमुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब प्रकरणांमध्ये तीव्र वाढ दिसून येते | पुणे...

0
पुणे: शहरात मधुमेह आणि उच्चरक्तदाबाच्या आढळलेल्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, या वाढीचे श्रेय PMC द्वारे स्क्रीनिंग कव्हरेजमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य...

बारामती बसस्थानक राज्यात अव्वल; स्वच्छतेच्या जोरावर मिळवला १ कोटींचा मानाचा पुरस्कार

0
पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार| बारामती बसस्थानकाने महाराष्ट्रातील सर्व बसस्थानकांसमोर आदर्श निर्माण करत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानात’ राज्यात प्रथम क्रमांक पटकावला...

पेठ भागातील 6,500 ग्राहकांना वीजपुरवठा खंडित झाला पुणे बातम्या

0
महावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करतातमहावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करतातमहावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करतातमहावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करतातमहावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करतात पुणे :...

तोंडाच्या कर्करोगात 2021 पासून झपाट्याने वाढ झाली आहे, केवळ 2 महिन्यांत 250 प्रकरणे

0
पुणे : केवळ एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रात 250 पुष्टी झालेल्या प्रकरणांसह स्क्रीनिंगमध्ये वाढ झाल्याने तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत तीव्र आणि चिंताजनक...

पुणे विषारी दारू प्रकरण : भिवंडीत FDA ची धडक कारवाई, मेथेनॉल साठा जप्त

0
मानव मित्र न्यूज |मुंबई प्रतिनिधी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्यातील यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणाचे धागेदोरे आता ठाणे जिल्ह्यातील भिवंडीपर्यंत...
Translate »
error: Content is protected !!