(तालुका घनसावंगी प्रतिनिधी राहुल नामदेव बोबडे ) तीर्थपुरी नगरपंचायतीला निधीचा दिलासा — रयत क्रांती संघटना व सदाभाऊ खोत यांचा मोठा वाटा
जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यातील तीर्थपुरी नगरपंचायतीला अखेर प्रलंबित निधी मिळाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बराच काळ रखडलेला हा निधी मंजूर होण्यासाठी स्थानिक पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरू होते.
या प्रक्रियेत रयत क्रांती संघटना यांचा मोठा वाटा असल्याचे समोर आले आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करत प्रश्न लावून धरला होता.
तसेच, सदाभाऊ खोत यांनी मुंबईत संबंधित विभागाशी संपर्क साधून निधी मंजूर करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या पुढाकारामुळे निधी वितरणाला गती मिळाली.
विशेष म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल योजना) अंतर्गत येणारा निधी अनेक दिवसांपासून अडकला होता. आता हा निधी मिळाल्याने पात्र लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामाला वेग येणार आहे.
स्थानिक नागरिकांकडून या संयुक्त प्रयत्नांचे स्वागत करण्यात येत असून, रखडलेली विकासकामे आता मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























