- पुणे/आळंदी रविदास कदम ): तीर्थक्षेत्र आळंदीची जीवनवाहिनी असलेल्या इंद्रायणी नदीच्या दुरवस्थेबाबत अखिल भारत हिंदू महासभाने आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला कडक शब्दांत निवेदन सादर केले आहे. वाढते प्रदूषण, सांडपाणी आणि जलपर्णीच्या विळख्यात अडकलेल्या नदीला तातडीने मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महासभेचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष वैभवराज रौंदळ आणि नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली.
🔴 महासभेच्या प्रमुख मागण्या
1️⃣ सांडपाणी थेट नदीत सोडणे त्वरित बंद करा
आळंदीतील मैलापाणी व ड्रेनेज प्रक्रिया न करता नदीत सोडले जात असल्याचा आरोप करत, सांडपाण्यावर पुनर्वापर प्रक्रिया (STP) प्रभावीपणे राबवण्याची मागणी.
2️⃣ जलपर्णी व राडारोडा हटवा
नदीपात्रातील जलपर्णी व कचऱ्यामुळे पाणी दूषित होत असल्याने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी.
3️⃣ जलशुद्धीकरण प्रकल्प प्रभावी करा
भाविकांना पवित्र आणि सुरक्षित पाणी मिळावे यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा सक्षम करावी.
4️⃣ बंधाऱ्याची दुरुस्ती करा
गळती रोखून पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करावे.
5️⃣ नियमित पोलीस पेट्रोलिंग सुरू करा
नदी परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर व अवैध कृत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी गस्त वाढवावी.
⚠️ “धार्मिक भावनांशी खेळू नका!”
“इंद्रायणी नदीचे पावित्र्य राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास अखिल भारत हिंदू महासभा आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशारा वैभवराज रौंदळ यांनी दिला.
यावेळी राष्ट्रीय संरक्षक श्री श्री 1008 जगतगुरू स्वामी माधवानंद सरस्वती जी महाराज, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष योगेंद्र वर्मा जी, महंत शिवनाथ जी महाराज, योगी दादानाथ जी महाराज, योगी ऋषिकेशनाथ जी महाराज, महंत सचिदानंद सरस्वती जी महाराज, महंत योगानंद सरस्वती जी महाराज, महंत केशवानंद सरस्वती जी महाराज, भावेश बळीराम पाटील, योगी सिद्धनाथ जी महाराज, योगी शीतलनाथ जी महाराज, योगी प्रकाशनाथ जी महाराज, योगी सुंदरनाथ जी महाराज, योगेश (सर) निंबाळकर, सौं. राणी पवार, सौ. आरती राजपूत, सौ. प्रिया राव, पुनम गांगुर्डे, अंकित वाघ, दिनेश माळी, अजिंक्य महांकाळे, शशिकांत शिंदे, विष्णू भाऊ बिचकुले, अशोक कुमार नानू राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून वारकरी संप्रदाय व स्थानिक नागरिकांनी महासभेच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























