परतूर प्रतिनिधी (गजानन राजबिंडे) बागेश्वरी साखर कारखान्यात ५ डिसेंबरपासून दुपटीने गाळप;गाळप हंगामात मोठा बदल करत आपली गाळप क्षमता दुपटीने वाढवली आहे. येत्या ५ डिसेंबरपासून कारखान्यात रोज १० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप सुरू होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी दिली.
पूर्वी कारखान्याची दररोजची गाळप क्षमता ५ हजार मेट्रिक टन होती. मात्र ती आता वाढवून १० हजार मेट्रिक टन करण्यात आली आहे. ही वाढीव क्षमता ५ डिसेंबरपासून कार्यान्वित होणार आहे.
✔ गाळपाचा आढावा
▪ क्षेत्रात एकूण ११,८६१ हेक्टर ऊसक्षेत्र
▪ आतापर्यंत १,२७,७६५ मेट्रिक टन गाळप पूर्ण
▪ यातून १,१२,०५० क्विंटल साखर उत्पादन
▪ साखरेचा उतारा १०.२२, आजअखेर ९.०९७%
▪ एकूण उपलब्ध ऊस : ११ लाख ५० हजार मेट्रिक टन (अंदाजे)
कारखान्याची क्षमता वाढल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस वेळेत जाईल याची हमी प्रशासनाने दिली असून परिसरातील ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
✔ उसाचा भाव व हप्ता रचना – चेअरमन शिवाजीराव जाधव
चेअरमन जाधव म्हणाले –
• हमीभाव : २९०० रुपये प्रति टन
• पहिला हप्ता : २५०० रुपये
• दुसरा हप्ता : २०० रुपये (जूनमध्ये)
• तिसरा हप्ता : २०० रुपये (दिवाळीला)
रिकव्हरी अधिक आल्यास उसाचा दरही वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
“शेतकऱ्यांनी घाई न करता स्वतःच्या बागेश्वरी कारखान्यालाच ऊस द्यावा. एकही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही,” अशी ग्वाहीही त्यांनी दिली दररोज १० हजार मेट्रिक

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























