(ता. पुरंदर, जि. पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार /
वीर गावामध्ये श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगी श्री आई यांची वार्षिक यात्रा मोठ्या भक्तिभावात सुरू असून ही यात्रा १ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारंभ झाली आहे. यात्रेच्या निमित्ताने ते वीर पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने काढण्यात येतो. या पालखी सोहळ्यासाठी हजारो भाविक पायी वारी करत वीर गावात दाखल होतात, ही परंपरा अनेक पिढ्यांपासून अखंड सुरू आहे.
यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे २ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ठीक १२ वाजता श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचा विवाह सोहळा मोठ्या भक्तीभावात संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्यापासून पुढे सलग दहा दिवस यात्रा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
यात्रेच्या काळात भजन, कीर्तन, भजी-गज, नैवेद्य अर्पण तसेच इतर धार्मिक विधी पार पडतात. या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो भाविक वीर गावात दर्शनासाठी येतात. श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभाव यांचा संगम असलेली ही यात्रा महाराष्ट्रातील अत्यंत मोठ्या व महत्त्वाच्या यात्रांपैकी एक मानली जाते.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























