आळंदी (प्रतिनिधी रविदास कदम,)
संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने “स्वच्छ जल, स्वच्छ मन” अभियान अंतर्गत मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही Sant Nirankari Charitable Foundation तर्फे प्रोजेक्ट अभियानचा चौथा टप्पा रविवारी, दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत इंद्रायणी नदी काठी, आळंदी देवाची येथे भव्य स्वरूपात राबविण्यात येणार आहे.
या स्वच्छता अभियानासाठी संत निरंकारी मंडळाच्या वतीने सर्व भक्तगणांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मानवसेवा हीच खरी सेवा या भावनेतून हजारो स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
संत निरंकारी मिशनतर्फे अध्यात्मिक सत्संगासोबतच समाजकल्याणाचे विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. यामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी शिबिर तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य अशा जनकल्याणाच्या उपक्रमांचा समावेश असतो. जगभरात एकाच वेळी हजारो ठिकाणी अशा सेवा मोहिमा राबविल्या जात असल्याचेही मंडळाने सांगितले. 
इंद्रायणी मातेच्या स्वच्छतेसाठी सर्व नागरिकांनी आणि भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन संत निरंकारी मंडळाच्या भोसरी संयोजक अंगद जाधव वतीने करण्यात आले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























