📰 बातमी (प्रतिनिधी अशोक कुंभार)
मुंबई, दि. २४ : आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वपूर्ण सोहळा असून यंदाच्या वारीत लाखो वारकरी आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी शासनाच्या सर्व विभागांकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती Devendra Fadnavis यांनी दिली.
विधानभवनात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar, पालकमंत्री Jaykumar Gore यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यंदाच्या वारीसाठी पालखी मार्गावरील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी मोठ्या प्रमाणावर जर्मन हॅंगर उभारण्यात आले असून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज तसेच इतर पालख्यांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय, पुणे विभागाबाहेरील पालख्यांनाही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. वारी पारंपरिक पद्धतीने आणि डीजेमुक्त वातावरणात साजरी व्हावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
यंदा आषाढी वारीचा सोहळा डिस्कव्हरी आणि जिओग्राफी वाहिन्यांद्वारे जगभर पोहोचणार असल्याने महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा जागतिक स्तरावर प्रचार होणार आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्याचे सांगितले. तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखी मार्गावर वारकरी आणि भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























