(प्रतिनिधी अशोक कुंभार, )
सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) – कुलवंत वाणी समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तुकाराम गाथा पारायण सोहळ्याची आज गुरुवार दि. ५ मार्च २०२६ रोजी भक्तीमय वातावरणात सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम सोपानदेव मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
२५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या गाथा पारायण सोहळ्याचा समारोप आज सकाळी महाअभिषेक करून करण्यात आला. त्यानंतर भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनातून संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आणि त्यांच्या विचारांचा संदेश उपस्थित भाविकांना देण्यात आला.
यानंतर समस्त कुलवंत वाणी समाजाच्या वतीने भाविकांसाठी भोजनाचा महाप्रसाद ठेवण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमाला समाजातील मान्यवर, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी सुमारे १ वाजता या पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























