पुरंदर सासवड |प्रतिनिधी अशोक कुंभार
Anna Hazare यांनी माहितीचा अधिकार (RTI) कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या निषेधार्थ येत्या ५ जुलै २०२६ पासून अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारकडे माहितीचा अधिकार कायदा अधिक प्रभावी आणि पारदर्शक ठेवण्याची मागणी केली असून, कायद्यातील काही दुरुस्तींमुळे नागरिकांच्या माहिती मिळविण्याच्या अधिकारावर परिणाम होत असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. या दुरुस्ती तातडीने मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. 
यासंदर्भात सरकारने सकारात्मक भूमिका न घेतल्यास ५ जुलैपासून राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या आंदोलनाकडे राज्यासह देशभरातील सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
लोकशाहीमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकवून ठेवण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा अत्यंत महत्त्वाचा असून, या कायद्याच्या मूळ उद्देशाला बाधा पोहोचणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी, असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























