संत तुकाराम महाराज बीज सोहळा 2026 : देहूत इंद्रायणी नदीच्या पाण्यावर बंदी
📍 देहू | पुणे जिल्हा अशोक कुंभार
संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्याच्या पार्श्भूमीवर देहू येथे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 3 ते 5 मार्च 2026 दरम्यान होणाऱ्या सोहळ्यात इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास व स्वयंपाकासाठी वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांनी आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने हा आदेश जारी केला असून, नदीतील वाढते प्रदूषण लक्षात घेता हा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आला आहे.
📌 बंदीचे मुख्य मुद्दे:
इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास व अन्न शिजवण्यासाठी वापरास मनाई
नदी पात्रात अंघोळ, कपडे धुणे व इतर पाणी दूषित करणाऱ्या कृतींवर बंदी
संसर्गजन्य आजार असलेल्या व्यक्तींना सोहळा परिसरात प्रवेशबंदी
भाविकांसाठी पर्यायी स्वच्छ पाण्याची व्यवस्था प्रशासनाकडून केली जाणार. 
दरवर्षी लाखो भाविक संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यासाठी देहूत दाखल होतात. मोठ्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत प्रशासनाने हा कडक निर्णय घेतला आहे.
इंद्रायणी नदी पवित्र मानली जात असली तरी वाढते औद्योगिक व सांडपाण्याचे प्रदूषण ही चिंतेची बाब ठरत आहे. यामुळे आरोग्यधोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा आदेश लागू करण्यात आला आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























