,(पुरदर प्रतिनिधी अशोक कुंभार)
पुणे | पुरंदर : पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील जमीन प्रकरणात प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भिवरी येथील रहिवासी सतीश सिताराम कटके यांनी प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कारभाराबाबत गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंडळ अधिकारी व गावकामगार तलाठी यांनी फेरफार क्रमांक 3267 हा कोणत्याही कायदेशीर आधाराशिवाय व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करता मंजूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित फेरफार मंजूर करताना नियमांची अंमलबजावणी न केल्यामुळे सदर निर्णय बेकायदेशीर असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भात सतीश कटके यांनी उपविभागीय अधिकारी (प्रांत) सासवड यांच्याकडे अपील क्रमांक 177/2025 दाखल केले असून, या अपीलवर संपूर्ण अभ्यास करून न्याय्य निर्णय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच फेरफार क्रमांक 1491 मध्ये सर्व वारसांना समान हक्क देण्यात आलेले असताना फेरफार क्रमांक 3267 मध्ये त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित निर्णयावर पुनर्विचार करून योग्य तो निर्णय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे पुरंदर प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























