Homeताज्या बातम्यापुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ५ बांगलादेशी महिलांवर पोलिसांची कारवाई

पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ५ बांगलादेशी महिलांवर पोलिसांची कारवाई

पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार ) पुण्यातील बुधवार पेठ परिसरात फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान ही कारवाई करण्यात आली. संबंधित महिला बेकायदेशीररीत्या भारतात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपासाची मोहीम राबविण्यात आली होती.
पोलिसांनी संशयित महिलांची चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतेही वैध ओळखपत्र, पासपोर्ट किंवा नागरिकत्वासंबंधी कागदपत्रे आढळून आली नाहीत. तसेच प्राथमिक चौकशीत त्या देहव्यापाराशी संबंधित असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना राष्ट्रगीत तसेच देशाच्या पंतप्रधानांविषयी माहिती विचारली असता समाधानकारक उत्तरे देता आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणामुळे बुधवार पेठ परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर आणखी कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. फरासखाना पोलिस पुढील तपास करत असून या महिलांच्या भारतातील प्रवेशाचा मार्ग, संपर्क आणि इतर संबंधित बाबींचा सखोल तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील पालखी मुक्काम पूर्ववत; भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरातच दोन दिवस विसावा

0
आळंदी देवाची,(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी सचिन शिंदे) आळंदी / प्रतिनिधी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा पुण्यातील मुक्काम यंदाही पूर्वीप्रमाणे भवानी पेठेतील श्री...

आळंदीतील घनकचरा डेपोवरून मोठा झोल; देवस्थानच्या अटींचा भंग झाल्याचा आरोप

0
पुणे (आळंदी संपादक रोहिदास कदम) Alandi : आळंदी नगरपरिषदेसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने चऱ्होली खुर्द येथील गायरान जमिनीपैकी तब्बल...

सासवडहून संत सोपानदेव महाराज पालखीचे १२ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान

0
पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार) संत सोपानदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सासवड येथून पंढरपूर कडे भक्तिमय वातावरणात...

वानोरी आणि पुणे कॅन्टमध्ये पावसाळ्यात येणारा पूर टाळण्यासाठी पीएमसीने भैरोबा नाल्यातील गाळ काढण्यास सुरुवात...

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाऱ्या भैरोबा नाल्यावरील पावसाळ्याला जेमतेम आठवडे उरले असताना पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) गाळ काढण्याचे आणि गाळ काढण्याचे काम...

IMD ने महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला; उष्ण दिवस आणि उकाड्याने पुण्याची पकड

0
पुणे: भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला असून, येत्या काही दिवसांत सतत उच्च तापमान आणि रात्रीच्या वेळी...

पुण्यातील पालखी मुक्काम पूर्ववत; भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरातच दोन दिवस विसावा

0
आळंदी देवाची,(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी सचिन शिंदे) आळंदी / प्रतिनिधी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा पुण्यातील मुक्काम यंदाही पूर्वीप्रमाणे भवानी पेठेतील श्री...

आळंदीतील घनकचरा डेपोवरून मोठा झोल; देवस्थानच्या अटींचा भंग झाल्याचा आरोप

0
पुणे (आळंदी संपादक रोहिदास कदम) Alandi : आळंदी नगरपरिषदेसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने चऱ्होली खुर्द येथील गायरान जमिनीपैकी तब्बल...

सासवडहून संत सोपानदेव महाराज पालखीचे १२ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान

0
पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार) संत सोपानदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सासवड येथून पंढरपूर कडे भक्तिमय वातावरणात...

वानोरी आणि पुणे कॅन्टमध्ये पावसाळ्यात येणारा पूर टाळण्यासाठी पीएमसीने भैरोबा नाल्यातील गाळ काढण्यास सुरुवात...

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाऱ्या भैरोबा नाल्यावरील पावसाळ्याला जेमतेम आठवडे उरले असताना पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) गाळ काढण्याचे आणि गाळ काढण्याचे काम...

IMD ने महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला; उष्ण दिवस आणि उकाड्याने पुण्याची पकड

0
पुणे: भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला असून, येत्या काही दिवसांत सतत उच्च तापमान आणि रात्रीच्या वेळी...
Translate »
error: Content is protected !!