(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार,) (जि. सोलापूर) : नातेपुते परिसरात आज पहाटे भीषण अपघात घडून फलटण येथील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईहून फलटणकडे निघालेली कार नातेपुतेजवळील पुलावरून खाली कोसळल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने पुलावरील कठडा तोडत थेट खाली खोल पाण्यात पडली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील तिघांनाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
या दुर्घटनेत फलटण येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, चालक मात्र जखमी अवस्थेत बचावला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात पडलेली कार बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात बचावकार्य राबवण्यात आले. 🚓🚑
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची पुढील चौकशी पोलीस करत आहेत.
⚠️ पहाटेच्या शांत वातावरणात घडलेल्या या अपघातामुळे नातेपुते परिसरात शोककळा पसरली आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम



















