Homeताज्या बातम्याइंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार)
देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे वारकरी, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नदी स्वच्छतेसाठी लाखो-कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याचे दावे प्रशासनाकडून केले जात असताना प्रत्यक्षात नदीतील जीवसृष्टीच धोक्यात आल्याचे चित्र समोर आले आहे. प्रदूषण, सांडपाणी आणि रासायनिक घटकांमुळे माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून यामुळे नदीकाठच्या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी देहूत दाखल होणार असताना इंद्रायणी नदीची ही अवस्था प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. “नदी स्वच्छतेच्या नावाखाली नेमका पैसा कुठे खर्च झाला?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या कार्यकर्त्यांनी मृत मासे बाहेर काढण्याचे काम हाती घेतले असले तरी प्रदूषणाला जबाबदार असलेल्या घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे..
इंद्रायणी नदीत हजारो मासे का मेले?
नदी प्रदूषणासाठी जबाबदार कोण?
स्वच्छता मोहिमांवर खर्च झालेल्या निधीचा हिशोब कोण देणार?
पालखी सोहळ्यापूर्वी नदी स्वच्छ करण्यासाठी तातडीची पावले उचलली जाणार का?
इंद्रायणीचे प्रदूषण ही केवळ पर्यावरणाची नव्हे तर श्रद्धेचीही हत्या असल्याची भावना वारकरी व्यक्त करत आहेत. दोषींवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

साईबाबांच्या चरणी विक्रमी दान; अवघ्या तीन दिवसांत ७७ कोटी ८१ लाखांची देणगी

0
बीड | प्रतिनिधी मेघा चाटे शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त देश-विदेशातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. २८ ते ३० जुलै २०२६...

आमदार विजय शिवतारे यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामीण भागासाठी नवीन PMPML बससेवा सुरू

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार,( पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत हडपसर–सासवड–कुंभारवळण–बेलसर–जेजुरी–नाझरे–मोरगाव या मार्गावर आजपासून नवीन PMPML बससेवा सुरू करण्यात आली आहे. या...

श्री क्षेत्र मरकळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न; धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी...

0
मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात...

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

साईबाबांच्या चरणी विक्रमी दान; अवघ्या तीन दिवसांत ७७ कोटी ८१ लाखांची देणगी

0
बीड | प्रतिनिधी मेघा चाटे शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त देश-विदेशातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. २८ ते ३० जुलै २०२६...

आमदार विजय शिवतारे यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामीण भागासाठी नवीन PMPML बससेवा सुरू

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार,( पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत हडपसर–सासवड–कुंभारवळण–बेलसर–जेजुरी–नाझरे–मोरगाव या मार्गावर आजपासून नवीन PMPML बससेवा सुरू करण्यात आली आहे. या...

श्री क्षेत्र मरकळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न; धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी...

0
मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात...

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...
Translate »
error: Content is protected !!