Homeताज्या बातम्याअंधाराशी दोन हात करून जनतेला दिलासा; आघाव साहेब व महावितरण कर्मचाऱ्यांच्या कार्याचा...

अंधाराशी दोन हात करून जनतेला दिलासा; आघाव साहेब व महावितरण कर्मचाऱ्यांच्या कार्याचा नागरिकांकडून गौरव

तीर्थपुरी | प्रतिनिधी राहुल बोबडे
महावितरणच्या तिर्थपुरी (ता. घनसावंगी) शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ एस. बी. आघाव साहेब हे आपल्या कार्यक्षम, कर्तव्यदक्ष आणि जनहिताच्या भूमिकेमुळे परिसरात विशेष ओळख निर्माण करत आहेत. वीज ग्राहकांना अखंडित, जलद आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या नेतृत्वाखाली तिर्थपुरी वीज वितरण केंद्राचा कारभार अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे.
आघाव साहेब आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून शिस्तबद्ध व वेळेत काम पूर्ण करण्यावर भर देतात. त्यांच्या प्रभावी नियोजनामुळे वीजपुरवठ्याशी संबंधित अनेक समस्या तातडीने सोडविल्या जात असून ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, पाऊस, वादळ, अंधार किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या तरी महावितरणचे कर्मचारी व अधिकारी नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. काळोख आणि संकटमय परिस्थितीतही बिनधास्तपणे घटनास्थळी पोहोचून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवाची पर्वा न करता काम करणारे हे धाडसी कर्मचारी खऱ्या अर्थाने जनसेवक आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे अनेक गावांमध्ये वेळेत वीजपुरवठा पूर्ववत होत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
ग्राहकांच्या अडचणी समजून घेत त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याची आघाव साहेबांची कार्यपद्धती सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. त्यामुळे तिर्थपुरी परिसरातील नागरिकांकडून त्यांच्या कामाचे मनापासून कौतुक केले जात आहे.
यावेळी राठोड साहेब, आण्णा जवजे आणि योगेश कायस्थ यांनीही आघाव साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा करत, जनतेसाठी दिवस-रात्र तत्परतेने काम करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा गौरव होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.


महावितरणच्या सेवेला अधिक सक्षम व लोकाभिमुख बनविण्यात आघाव साहेबांचे योगदान उल्लेखनीय असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली संपूर्ण टीम जनतेच्या विश्वासास पात्र ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकरी नाकारण्याची हिंमत कुणाची?

0
आळंदी.देवाची,(प्रतिनिधी रविदास कदम,) ) महाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकरी नाकारण्याची हिंमत कुणाची? रोजगाराच्या नावाखाली भाषिक भेदभाव; मराठी अस्मितेवर घाला महाराष्ट्रात राहायचे, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा, महाराष्ट्राच्या बाजारपेठेतून कोट्यवधींची...

पुण्याच्या पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी ७०% संमती, मुदतवाढीचा निर्णय प्रलंबित

0
पुणे : प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन संमती प्रक्रिया 70% पर्यंत पोहोचली आहे, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण 1,285 हेक्टरपैकी सुमारे 851 हेक्टरसाठी...

नसरापूर खटला निर्णायक टप्प्यात; 48 साक्षीदार तपासण्यात आल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे

0
आजपर्यंत एकूण 48 साक्षीदार तपासण्यात आले पुणे: नसरापूर बलात्कार आणि खून खटल्यातील खटला निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, आतापर्यंत 48 फिर्यादी साक्षीदार तपासले गेले...

आळंदी नगरपरिषदेकडून पर्यावरणाचा खेळखंडोबा? कचरा डेपोमध्ये सर्रास कचरा जाळण्याचा प्रकार!

0
आळंदी (रवी कदम) : संतांची नगरी आळंदीमध्ये कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून आळंदी नगरपरिषदेच्या कचरा डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविली जात...

हिडमा मडावी गाण्यावर नृत्य प्रकरण; दोन विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन

0
पुणे | मानव मित्र न्यूज रविदास कदम विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन विद्यार्थ्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. आर. शेट्टी यांच्या न्यायालयाने अटी-शर्तींसह अटकपूर्व...

महाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकरी नाकारण्याची हिंमत कुणाची?

0
आळंदी.देवाची,(प्रतिनिधी रविदास कदम,) ) महाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकरी नाकारण्याची हिंमत कुणाची? रोजगाराच्या नावाखाली भाषिक भेदभाव; मराठी अस्मितेवर घाला महाराष्ट्रात राहायचे, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा, महाराष्ट्राच्या बाजारपेठेतून कोट्यवधींची...

पुण्याच्या पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी ७०% संमती, मुदतवाढीचा निर्णय प्रलंबित

0
पुणे : प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन संमती प्रक्रिया 70% पर्यंत पोहोचली आहे, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण 1,285 हेक्टरपैकी सुमारे 851 हेक्टरसाठी...

नसरापूर खटला निर्णायक टप्प्यात; 48 साक्षीदार तपासण्यात आल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे

0
आजपर्यंत एकूण 48 साक्षीदार तपासण्यात आले पुणे: नसरापूर बलात्कार आणि खून खटल्यातील खटला निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, आतापर्यंत 48 फिर्यादी साक्षीदार तपासले गेले...

आळंदी नगरपरिषदेकडून पर्यावरणाचा खेळखंडोबा? कचरा डेपोमध्ये सर्रास कचरा जाळण्याचा प्रकार!

0
आळंदी (रवी कदम) : संतांची नगरी आळंदीमध्ये कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून आळंदी नगरपरिषदेच्या कचरा डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविली जात...

हिडमा मडावी गाण्यावर नृत्य प्रकरण; दोन विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन

0
पुणे | मानव मित्र न्यूज रविदास कदम विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन विद्यार्थ्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. आर. शेट्टी यांच्या न्यायालयाने अटी-शर्तींसह अटकपूर्व...
Translate »
error: Content is protected !!