पुणे तालुका राजगुरुनगर (संपादक रोहिदास कदम)मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत घोटवडी ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवत आदर्श कामकाजाचा ठसा उमटविला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक १४ मे २०२६ रोजी पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. समीर वाढारकर व त्यांच्या पथकाने ग्रामपंचायत घोटवडी येथे भेट देत ग्रामपंचायत कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांची पाहणी केली. यावेळी कार्यालयीन दप्तर तपासणी करून शासकीय कामकाजाची सविस्तर माहिती घेण्यात आली.
दुर्गम भागातील ग्रामपंचायत असूनही नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुखसुविधा, स्वच्छता व नियोजनबद्ध कामकाज पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. अभियानाच्या तयारीसाठी ग्रामपंचायत (अधिकारी मोनिका गुंजाळ ),कर्मचारी वाळू वाकचौरे, नामदेव पारधी यांनी विशेष मेहनत घेतली. संगणकीय कामकाज स्नेहल राऊत यांनी सांभाळले, तर गणपत धादवड व निखिल दाते यांनी मोलाचे सहकार्य केले.
तपासणीदरम्यान जी.प. शिक्षक मुकने सर, पशुवैद्यकीय अधिकारी राठोड सर, अंगणवाडी सेविका सुभाबाई धंदे, संगीता अभंग, मदतनीस रेखा धंद्रे व जनाबाई निधन उपस्थित होत्या. कार्यक्रमात पोषण आहार, बचत गटांचे खाद्यपदार्थ तसेच आदिवासी भागातील रानभाज्या व फळांचे आकर्षक स्टॉल उभारण्यात आले होते.
यावेळी ग्रामस्थ, पंचायत समिती अधिकारी, संघटनेचे पदाधिकारी व विविध विभागातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच विष्णूशेठ दळवी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष पुढाकार घेतला. अभियानादरम्यान खेडचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे, आदर्श सरपंच सुनीलशेठ धंद्रे, जिल्हा परिषद सदस्य समीरशेठ सुपे व पंचायत समिती सदस्य दिनेशशेठ हांडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























