Homeताज्या बातम्यामहारवतन धारक शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे ९ व्या दिवशीही प्रशासनाचे दुर्लक्ष

महारवतन धारक शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे ९ व्या दिवशीही प्रशासनाचे दुर्लक्ष

पुरंदर : प्रतिनिधी अशोक कुंभार)
पुरंदर तालुक्यातील आंबोडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक शेतकऱ्यांच्या जमिनीतून बेकायदेशीररित्या रस्ता मंजूर केल्याच्या आदेशाविरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले असून, आज आंदोलनाचा नववा दिवस आहे. मात्र उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी या आंदोलनाची अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही.
पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत व सासवडचे मंडल अधिकारी सुहास कांबळे यांनी आर्थिक तडजोडीतून संगनमताने कायदा पायदळी तुडवून, मूळ शेतकरी किंवा गावचा रहिवासी नसलेल्या उद्योजक अन्वर शेख यांना महारवतन धारक शेतकऱ्यांच्या जमिनीतून रस्ता मंजूर केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सदर आदेश तात्काळ रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शेतकरी प्रांत कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
बाधित गट क्रमांक १३१ हा वनक्षेत्र आरक्षित असताना तसेच अन्य हक्कात ग्रामपंचायत आंबोडीचे नाव असताना, ग्रामपंचायत व वनविभागास कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. तसेच रस्ता मागणी अर्जात कुंभारवळण–आंबोडी शिवरस्त्याचा उल्लेख असतानाही, कुंभारवळण गावाचे सातबारा उतारे जोडले गेले नाहीत, ही बाब मंडल अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना सादर केलेल्या अहवालात नमूद केली नसल्याचा आरोप आहे.
अर्ज फेटाळण्यास पात्र असतानाही तहसीलदार विक्रम राजपूत यांनी पीडित शेतकऱ्यांना नोटीस न देता व स्थानिकांचा अर्ज नसताना पदाचा गैरवापर करून चुकीचा आदेश दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या आदेशामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून, त्यामुळे गेल्या ९ दिवसांपासून उपोषण सुरू आहे.
प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास तहसीलदार विक्रम राजपूत व मंडल अधिकारी सुहास कांबळे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी व सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा उपोषणकर्ते शेतकरी प्रकाश रणपिसे, चंद्रकांत रणपिसे व अशोक रणपिसे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एअर इंडियाच्या पुण्याला जाणाऱ्या फ्लायर्ससाठी चाचणीची वेळ

0
पुणे: मंगळवारी रात्री उशिरा एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून पुण्याला जाण्यासाठी निघालेले सुमारे 100 प्रवासी उन्हाच्या तडाख्यात एका रखडलेल्या विमानात बसले, उतरले आणि पुन्हा चढले,...

जुन्नरजवळ शेत तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू

0
पुणे : पुण्यापासून ९५ किमी अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे मंगळवारी १२ आणि ८ वर्षांच्या दोन मुलांचा शेत तलावात बुडून मृत्यू...

सरकारी जमिनीवरील वादांना आता स्थानिक पातळीवर तोडगा!

0
(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी रोहिदास कदम ) राज्यातील सरकारी जमिनीच्या व्यवहारांमधील शर्तीभंग प्रकरणांवर आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक...

निगडीतील १३२ केव्ही हाय टेंशन ट्रान्समिशन टॉवरवर चढल्याने वाहतूक कोंडी, वीजवाहिनी बंद; 3 तासांनंतर...

0
पुणे: निगडीतील यमुनानगर भागातील 132 केव्ही हाय-टेन्शन ट्रान्समिशन टॉवरवर पोलिसांनी 'मानसिकदृष्ट्या अस्थिर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणाने सोमवारी रात्री तीन तास चाललेले बचावकार्य यशस्वीरित्या संपले.अज्ञात...

महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, 46-47° सेल्सिअस उष्णतेमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान होते; शेतकऱ्यांना उत्पादन नुकसान, भाव...

0
पुणे: महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ४२-४७ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या अति उष्णतेमुळे शेतातील भाजीपाला पिके जळू लागली आहेत, शेतकरी आणि उत्पादक गटांनी उत्पादनात मोठ्या प्रमाणात...

एअर इंडियाच्या पुण्याला जाणाऱ्या फ्लायर्ससाठी चाचणीची वेळ

0
पुणे: मंगळवारी रात्री उशिरा एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून पुण्याला जाण्यासाठी निघालेले सुमारे 100 प्रवासी उन्हाच्या तडाख्यात एका रखडलेल्या विमानात बसले, उतरले आणि पुन्हा चढले,...

जुन्नरजवळ शेत तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू

0
पुणे : पुण्यापासून ९५ किमी अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे मंगळवारी १२ आणि ८ वर्षांच्या दोन मुलांचा शेत तलावात बुडून मृत्यू...

सरकारी जमिनीवरील वादांना आता स्थानिक पातळीवर तोडगा!

0
(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी रोहिदास कदम ) राज्यातील सरकारी जमिनीच्या व्यवहारांमधील शर्तीभंग प्रकरणांवर आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक...

निगडीतील १३२ केव्ही हाय टेंशन ट्रान्समिशन टॉवरवर चढल्याने वाहतूक कोंडी, वीजवाहिनी बंद; 3 तासांनंतर...

0
पुणे: निगडीतील यमुनानगर भागातील 132 केव्ही हाय-टेन्शन ट्रान्समिशन टॉवरवर पोलिसांनी 'मानसिकदृष्ट्या अस्थिर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणाने सोमवारी रात्री तीन तास चाललेले बचावकार्य यशस्वीरित्या संपले.अज्ञात...

महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, 46-47° सेल्सिअस उष्णतेमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान होते; शेतकऱ्यांना उत्पादन नुकसान, भाव...

0
पुणे: महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ४२-४७ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या अति उष्णतेमुळे शेतातील भाजीपाला पिके जळू लागली आहेत, शेतकरी आणि उत्पादक गटांनी उत्पादनात मोठ्या प्रमाणात...
Translate »
error: Content is protected !!