पुणे तालुका खेड प्रतिनिधी (रोहिदास बबन कदम)
खेड तालुका – करंजविहिरे येथील भामा-आसखेड धरण शंभर टक्के भरले असून, धरणातील जलपूजनाचा सोहळा आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी धरणातील जलाशयात साडी-चोळी व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
धरण परिसरात १ जूनपासून आतापर्यंत ९५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणीपातळी ६७१.५० मीटर असून, धरणात सध्या ८.१४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे काही दिवस सुरू असलेला विसर्ग आता बंद करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास जलसंपादा विभागाचे अधीक्षक अभियंता कुमार पाटील, उपअभियंता मोहन जाधव, सहाय्यक अभियंता अश्विन पवार, माजी पंचायत समिती सदस्य वसंत ढोकरे, रोहिदास गडदे, शिवसेना तालुका संघटक सुभाष माऺडेकर, एल. पी. तनपुरे, संतोष राक्षे अंकुश दरेकर, रमेश बोराटे, चंद्रकांत सातपुते, अमोल पाचपुते, अभय डांगळे, शशिकांत आहेरकर, मारुती धनवटे, सचिन तुळवे आदीसह नागरिक व धरण प्रशासनाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भामा-आसखेड खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजविहिरे येथे भामा आसखेड धरण प्रकल्प आहे धरणाचा फायदा
खेड, शिरूर, दौंड, हवेली या तालुक्यांसह पुणे महानगरपालिकेच्या पूर्व भागाला, आळंदी शहराला, खेड एमआयडीसीला आणि तालुक्यातील १९ गावांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे धरण शंभर टक्के भरल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























