तीर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे)
तीर्थपुरी नगरपंचायतीतील ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. घरकुल योजनेसाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नसल्याने गोरगरीब नागरिक त्रस्त झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की, नगरपंचायतीतील काही अधिकारी कामाकडे दुर्लक्ष करून कार्यालयात एसीमध्ये बसून झोपा काढत
“गरीब जनता घरकुलाच्या पैशासाठी वारंवार कार्यालयाचे फेरे मारत आहे, पण अधिकारी मात्र झोपा काढण्यात व्यस्त आहेत. लोकांचे काम वेळेत होत नसेल तर अशा अधिकाऱ्यांचा उपयोग काय?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, घरकुल निधी तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे।

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























